गडनदी धरण भरले ! नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. नागरीकांनी खबरदारी घ्यावी -पा.प्र.बां कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरण क्षेत्रात ८ जुलै २०२४ रोजी पर्जन्यमापन व पाणी पातळीची नोंद करण्यात आली. धरणाची एकूण पाणी पातळी १२२.२० मीटर इतकी आहे तर सध्या गडनदी धरणात एकूण पाणीसाठा ६९.९६४८ द.ल.घ.मीटर आणि उप.पाणीसाठा ६९.६५२८ द.ल.घ.मी. आहे. दि. ८ जुलै २०२४ रोजी १७५.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.एकुण पाणी १२८७.०० मि.मी. आहे.
सांडव्यावरील विसर्ग – १२६५४२ क्युमेक्स तर विमोचकातील सोडलेले पाणी ०.०० क्युमेक्स आहे.गडनदी धरण ३ जूलै २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता भरुन वाहू लागले त्यावेळी पाणी पातळी १२१.२० मीटर इतकी होती तर सांडव्यावरुन १.३१५ क्यूसेक्स इतके पाणी नदीपात्रात वाहत आहे.
नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना जारी केल्या आहेत पावसाचा जोर वाढल्यास शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वत सह जनावरांची काळजी घेण्याचे आव्हाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतक-यांना वरदान ठरु पाहत आहे धरणात क्षमतापुर्ण पाणीसाठा सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सध्य पावसाला जोर आहे गडनदी धरण पहायला जाणा-यांनी धरणात उतरु नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये नाकरीकांनी आपली खबरदारी घ्यावी असे आव्हाहन पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांनी केले आहे.



